-->

Ads

Bhopal News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरातील अयोध्या नगर भागात कुत्र्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 


भोपाळ: भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सात महिन्यांच्या एका बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.

भोपाळच्या अयोध्या नगर भागात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ही बाब पोलिसांच्या तसेच प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. घटनेच्या दिवशीच बाळाच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाचे दफन केले होते. मात्र पोलिसांनी हा मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

गुणा जिल्ह्यातून मजुरीसाठी भोपाळला मजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील हे बाळ होते. बाळाच्या आईने काम करताना, बाळाला जमिनीवर ठेवले असताना, कुत्र्यांच्या टोळक्याने या बाळाचे चावे घेतले आणि त्याला फरफटत नेले, अशी माहिती अयोध्या नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश निलहारे यांनी दिली. ही बाब लक्षात येताच लोकांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत घटनास्थळीच बाळाचा मृत्यू झाला होता. या बाळाचा एक हातही शरीरापासून विलग झाला होता. बाळाच्या कुटुंबीयांनी घटनेच्या दिवशीच बाळाचे दफन केले होते. मात्र पोलिसांनी हा मृतदेह पुन्हा बाहेर काढठून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


जिल्हा प्रशासनाने बाळाच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली असून आणखी ५० हजार रुपये लवकरच दिले जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली. या घटनेनंतर महापालिका हद्दीतील अयोध्या नगर भागातून आठहून अधिक भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय, शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.या संदर्भात पोलिस एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

रेबीज लस; केरळ सरकारला विचारणा
नवी दिल्ली:मनुष्यांना द्यावयाच्या इंट्राडर्मल रेबीज लशीच्या (आयडीआरव्ही) प्रभावितेचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्या. सी. टी. रविकुमार आणि राजेश बिंदाल यांच्या खंडपीठाने केरळ सरकारला दिले आहेत.केरळ प्रवासी असोसिएशनने या प्रश्नी याचिका दाखल केली आहे.


Post a Comment

0 Comments