-->

Ads

येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड पळाला, हत्या प्रकरणातील कैदी आशिष जाधव फरार

Pune Crime : पोलिसांना चकवा देऊन आणखी एक कैदी येरवडा तुरुंगातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.


पुणे : येरवडा कारागृहातून कैदी फरार होण्याचे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वी अनेक कैदी पुण्याच्या कुप्रसिद्ध येरवडा जेलमधून पसार झाले आहेत. तरीही कारागृह प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो. खुनाच्या आरोपाखाली येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव काल पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांना चकवा देऊन आणखी एक कैदी तुरुंगातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

२००८ साली वारजे पोलीस स्टेशन येथे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आशिष जाधवला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने ३०२ च्या आरोपाखाली त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

संवेदनशील अन् कडक सुरक्षा व्यवस्थेत काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळे जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments