-->

Ads

लग्न उद्यावर, हळदीची जोरदार तयारी; नवरीला भावानं मंडपात संपवलं; कल्याणी पाटीलचा दोष काय?

घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असताना नवरीच्या चुलत भावानं तिच्यावर चाकूनं हल्ला केला. तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

अहमदाबाद: गुजरातच्या सूरतमध्ये हॉनर किलिंगचं भयंकर प्रकरण घडलं आहे. बहिणीच्या प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या भावानं तिची मंडपामध्येच हत्या केली. कुटुंबाच्या परवानगीशिवाय तरुणीनं तिच्या प्रियकरासोबत कोर्टात विवाह केलं. त्यानंतर तरुण-तरुणी विधीवत विवाहाची तयारी करत होते. लग्नाच्या एक दिवस आधी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी तरुणीच्या चुलत भावानं तिच्या पोटात चाकू खुपसला. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

नवरदेवाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात लग्न केल्यानंतर कल्याणी गेल्या १ महिन्यापासून घरात सुनेप्रमाणे राहत होती. त्यानंतर आम्ही दोघांचा विधिवत विवाह करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी संध्याकाळी नवरदेव आणि नवरीच्या हळदीची तयारी सुरू होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. त्याचवेळी कल्याणी पाटीलचा चुलत भाऊ हिंमत पाटीलनं चाकूनं भोसकून तिची हत्या केली. त्यामुळे आनंदाची जागा आक्रोशानं घेतली.


'कल्याणीचा विवाह कुटुंबानं २९ मे रोजी निश्चित केला होता. लग्नाच्या पत्रिका वाटण्यात आल्या होत्या. सर्व काही ठरलं होतं. मात्र लग्नाच्या आठवडाभर आधी बहिणीनं तिचा प्रियकर जितेंद्र महाजनसोबत लग्न केलं. आता दोघे हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार होते, अशी माहिती आरोपी मोनूनं दिली,' असं लिंबायत पोलीस निरीक्षक जोगराणा यांनी सांगितलं.

कल्याणी आणि जितेंद्र यांचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंब आधी एकमेकांच्या जवळ राहायची. पाटील आणि महाजन काही वर्षांपूर्वी शेजारी होते. मात्र पाटील कुटुंबाचा प्रेम संबंधांना विरोध होता. जितेंद्र मजुरी करायचा. मोनू पाटीलदेखील कापड बाजारात मजुरीचं काम करायचा. यासोबतच पाणी विक्रीचं कामही करायचा. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं.


Post a Comment

0 Comments