कल्याण-डोंबिवलीत चोरट्यांचा हैदोस थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दिवसाढवळ्या देवाच्या दारीही चोऱ्या होत आहेत.
मठाच्या परिसरातून अज्ञातांनी गाडी चोरली
कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाच्या परिसरातून चारचाकी गाडी चोरीला गेली होती. ही गाडी रमेश शिंत्रे यांनी स्वामी समर्थ मठाचे उत्तराधिकारी सचिन चांदे आणि प्रथमेश मोडक महाराज यांना त्यांच्या सेवेसाठी इतर ठिकाणी मठामध्ये आणि कार्यक्रमासाठी जाण्यासाठी दिली होती. मात्र हीच गाडी मठाच्या परिसरातून काही अज्ञात व्यक्तींनी चोरी केली.
यासंदर्भातील खडकपाडा पोलीस ठण्यात देऊन तक्रार 20 दिवस उलटूनही अद्याप चोरटे मोकाटच आहेत. यामुळे लवकरात लवकर गाडीचा छडा लावावा आणि आरोपींना अटक करावे, अशी मागणी स्वामी समर्थ मठातील सेवक दुषांत ढवळे यांनी केली आहे. तसेच चारचाकी वाहन चोरीला जात असल्याने परिसरातील इतर वाहनचालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.
0 Comments