राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक महिला आणि पुरुष तब्बल 20 वर्ष सोबत राहत होते. मात्र, 50 व्या वर्षी महिलेने बलात्काराची तक्रार केली आहे.
मागील 20 वर्षांपासून एक महिला आणि पुरुष सोबत राहत होते. मात्र, त्या दोघांमध्ये काही कारणांमध्ये वाद झाले. त्यानंतर महिलेचे एक तक्रार केली आहे. आपल्यासोबतच्या पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार केली आहे. चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर 54 वर्षाच्या नागरिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्यक्ती कर्नाटकातील आहे.
आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेसोबत बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले, तक्रारीत म्हटले आहे. तसेच या महिलेला मारहाणही करण्यात मारहाण केली, यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोथरुडमधील 50 वर्षाच्या महिलेने ही तक्रार केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments